सुखाचा शोध
- वि. स. खांडेकर
वि. स. खांडेकर ह्यांच्या लेखणीशी मी connect करू शकते. सुखाचा शोध वाचायला घेतलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या लेखणीशी connect व्हायला मिळालं. कथेचा नायक आनंद याची कुटुंब ऋणाची भावना, उषा या नायिकेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून तिला घरी आणने आणि उषाने आनंदाने आनंदाचे आभार मानत, मनातून प्रेम, प्रेम काय त्याची भक्ती करणे हाच जणू तिचा धर्म आहे असं मानून त्याच्या घरावर आणि कुटुंबावर प्रेम करणे, अश्यातून आनंदाचा मोठा भाऊ अप्पाराव संसारात विलास नसलेला पण समाजसेवेचा नाटक मांडणारा आनंदाचं लग्न ठरवतो ते माणिकशी. माणिक कोण तर पुरुष वजा अप्पारावच. नाटकीय स्त्रीवादी स्वभाव, गरज म्हणून केलेलं लग्न, आनंदाच्या प्रेमाचा एक तुषारही तिला भोगता आला नाही, इतकी ती रुक्ष कशी लिहिली वि.स. नी! आनंदाचा सुख कुटुंबात, उषाचं आनंदा मध्ये, आणि माणिकचं सुख कशात हेच तिला ठरवता आलेलं नाही...कथे मध्ये इतके सुंदर रित्या व्यक्ती रेखाटने आणि वाचताना कुठेही आपण एकही character चा हात सोडला नाही... सगळ्यांसोबत आहोत असंच वाटणं हे माझ्यासाठी वि.स. च्या कदंबऱ्यांमध्ये होतं. सगळे characters आई, अप्पा, आनंद, उषा, माणिक, धनंजय, चंचला जणू प्रत्येकाला एक clear drafted identity दिलीये. शब्द गुंफणे आणि त्याची एक सुंदर माळ होणे आणि त्या माळेचा कधीही अंत होऊ नये असं त्या कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात वाटतं...हीच जादू आहे वि.सं. ची!
No comments:
Post a Comment