पानगळीचं झाड
लेखक: रत्नाकर मतकरी
पानगळीचं झाड हे रत्नाकर मतकरी लिखित पुस्तक ही एक सत्य कथा आहे. 1960-70 च्या दशकातली. एका मासिकात एका समाजसेवकाची कथा मतकरी यांनी वाचली.त्या समाजसेवकाने आपली प्रतिष्ठीत नोकरी सोडून कुष्ठरोग्याना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि एका तरुणीची कुष्ठरोगातून झालेली मुक्तता, तिचं पुनर्वसन आणि नंतर समाजापुढे आदर्श म्हणून त्याने तिच्याशीच केलेलं लग्न यावर ती कथा होती. ही कथा वाचल्यावर त्यांना ती विलक्षण वाटली म्हणून त्यांनी स्वतः पुण्यात जाऊन त्या जोडप्याची भेट घेतली आणि त्यांचा प्रवास रचनात्मक पद्धतीने या पुस्तकात मांडला.
हे पुस्तक दोन भागात समजून घेता येईल.
पहिला भाग नायिकेच्या म्हणजे 'बेटी' च्या आयुष्याच्या. एस.एस.सी. च्या परीक्षे नंतर लगेच लग्न करून संसार करावा अशी स्वप्न रंगावणारी ती, तिच्या आयुष्यात भूकंप आला जेव्हा तिला कळालं की तिच्या आयुष्यात कधीही रंगच्या छटा असूच शकत नाही. तिला कुष्ठरोग झालंय! घरात वडिलांच्या व्यक्तिरिक्त इतर व्यक्तीनी आणि समाजाने केलेली घृणा सहन न झाल्याने ती कुटुंब सोडून कुष्ठरोगी वसाहतीमध्ये ती राहायला जाते. मानसिक आणि शारिरीक रित्या पूर्णतः खचून गेलेली असते. कुष्ठरोगामुळे होणारी अंगाची लाही, होण्याऱ्या reactions, जखमा हे वाचलं तरी अंगावर काटा येईल, ती ते सगळं सहन करत होती! असंच ती आयुष्याचा एक एक दिवस ढकलत होती.
दुसरा भाग म्हणजे एक शिकलेला तरुण, शिकून उस्मानाबाद जिल्ह्यात एक खेडेगावात शिक्षकाची नोकरी करत असतो. त्या गावात कुष्ठरोग्यांच्या संख्या बऱ्याच प्रमाणात असते. ह्या भीतीने तो बदलीसाठी निष्फळ प्रयत्न करतो. अश्यात एक कुष्ठरोग्याशी जणू त्याची गट्टी जमते. कुष्ठरोगी सुद्धा माणसंचं आहेत आणि त्यांना ही निरोगी माणसांइतकाच जगण्याचा हक्क आहे ह्याची त्याला जाणीव होते. बरेच दिवस या गोष्टींचा विचार करून तो आपला आयुष्य अश्या लोकांच्या सेवेत घालवायचं अस ठरवतो आणि नोकरीचा राजीनामा देतो. तिथून त्याचा प्रवास त्याच कुष्ठरोगी वसाहती मध्ये येऊन ठेपतो जिथे 'बेटी' आहे.
मग पुढे सुरू होतो तो 'त्यांचा' प्रवास...त्याने अभिभावक म्हणून तिला दिलेला धीर, जगण्याची उमेद, बरी होण्याचा आत्मविश्वास आणि साथ. मग तिची झुंज त्या असहाय्य वेदनांशी, Guinea Pig असल्या सारख औषधांचे experiments, त्यातून होणारे reactions, देवासारखे भेटलेले Dr. Rao, मग मुंबईच्या leprosy केअर सेंटर मध्ये झालेले उपचार आणि शेवटी तिची रोगातून मुक्तता. सरते शेवटी बरेच वर्षांनी त्या दोघांची भेट!!!
आपण प्रत्येक व्यक्ती पण पानगळीचं झाड असतो का? आयुष्याचा कालचक्र चालू असतो, बहर येतो, नवी पानं फुटतात, मग फुलतात, मग पानं पिकतात, मग पानगळ होते मग पाऊस येतो मग पुन्हा नवी पानं फुटतात....
P.S. : रत्नाकर मतकरी यांचे मे 2020 मध्ये कोरोना मुळे निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment